मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. यावरच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
“काही पुढारी विकले गेले, परंतु कोल्हापुरातील जनता विकली जाणार नाही. तुमच्या पाठीशी राहील.
2024 ला कोल्हापुरातून संजय पवार आमदार असतील, फक्त यावेळी शिवसेनेने त्यांना विधानसभेला तिकीट देणे गरजेचे आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेतून राज्यसभेच्या तिकिटाची लॉटरी लागली, विजयी धनंजय महाडिक झाले पण चर्चेत मात्र अजूनही संजय पवारच आहेत.”, असे तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे.
https://www.facebook.com/100002397939695/posts/5208874695869077/
दरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीत जागांच्या अंकगणिताच्या आधारे उमेदवार उभे केले तर विजय निश्चित असतो आणि त्यामुळेच बहुतांश उमेदवार बिनविरोध विजयी होतात. पण इथे एक आव्हान होतं. ही लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होती. मात्र थेट भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेना विजयाची स्वप्ने पाहत राहिली आणि फडणवीस यांनी रणनीतीच्या क्षेत्रात स्वत:ला ‘सिद्ध’ केले. रात्री उशिरापर्यंतच्या गदारोळानंतर निकाल येताच भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. तीन मोठ्या पक्षांची युती करून सरकार चालवणाऱ्या शिवसेनेला पुरेसे संख्याबळ असूनही संजय पवार यांनी परावभ पचवावा लागला.
महत्वाच्या बातम्या:
- “पंकजा मुंडेंना दुर्लक्षित करणे हा पण त्याच रणनीतीचा…”, ‘राष्ट्रवादी’चा फडणवीसांना टोला
- “…आम्ही लोकांना जवळ करण्यात अपयशी ठरलो हे त्यांना सांगायचंय” ; छगन भुजबळ यांचं वक्तव्य
- SL vs AUS : ३ ओव्हर्स आणि ५९ रन्स..! लंकेच्या कॅप्टनची ‘धमाका’ खेळी; पाहा VIDEO!
- पंकजा ताईंसाठी विधानपरिषद म्हणजे काय जीवन मरणाचा प्रश्न नाही – प्रवीण दरेकर
- दोन दिवस आमच्या हातात ईडी द्या, फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील – संजय राऊत


