मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा न्युझीलंडने ८ गडी राखुन पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघावर सर्व स्तरातुन टिका होत आहे. या टिकेच्या केंद्रस्थानी भारतीय फलंदाजी आहे.
या सामन्यातील अपयशानंतर माजी भारतीय क्रिकेटपटु आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी अंजिक्य रहाणेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले,’अंजिक्य रहाणेने अनेकदा कर्णधार म्हणून परदेशात भारताला विजय मिळवून दिला. मात्र फलंदाज म्हणून त्याची फंलदाजी म्हणावी तशी बहरली नाही. ही गोष्ट अंजिक्य स्वत: नाकारु शकत नाही. भविष्यात तो नक्की फलंदाज म्हणून कामगीरी सुधारेल.’ अशी अपेक्षा बांगर यांनी व्यक्त केली.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी रहाणेला पर्याय म्हणून करुण नायर आणि हनुमा विहारीचे नाव पुढे केले. एक दोन सामन्यातील अपयशानंतर नायरला संघाबाहेर केल्यामुळे बांगर यांनी नाराजी दर्शवली. डब्ल्युटीसी सामना गमावल्यानंतर मधल्याफळीत हनुमा विहारीचे पुनरागमन होऊ शकते अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही.
महत्वाच्या बातम्या
- …तरीही शिखर धवनला संधी नाहीचं
- ‘भारतीय संघ इंग्लंडमध्ये यशस्वी होईल’, चॅपेलनी व्यक्त केला विश्वास
- अतीउत्साह नडला अंगी! ‘त्या’ वक्तव्यामुळे कार्तिकला मागावी लागली माफी
- अतीउत्साह नडला अंगी! ‘त्या’ वक्तव्यामुळे कार्तिकला मागावी लागली माफी
- डेल्टा प्लस चा जिल्ह्यात एकही रुग्ण नसताना बाजारपेठेवर वेळेचा निर्बंध का?? जिल्हा व्यापारी महासंघाचा आक्षेप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

