टीम महाराष्ट्र देशा : गेल्या साडे चार वर्षापासून एकमेकांवर चिखलफेक केल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांनी पुन्हा गळ्यात गले घालून युती केली आहे. मात्र या युतीची विरोधकांकडून जोरदार खिल्ली उडवण्यात येत आहे. आता यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निशाणा साधला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता पुन्हा शिवसेना विरुद्ध मनसे वाद पेटण्याची चिन्ह आहेत.
संदीप देशपांडे काय म्हणाले?
“शिवसैनिकांनी उद्धव साहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही, तो न्यायालयात सुद्धा टिकेल, असं मला मूळचा शिवसैनिक असलेला वकील सांगत होता.” असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
अफझल खानाच्या साक्षीने प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने शरयू आणि चंद्रभागेच्या स्नाना मुळे युती मीठी नदीकाठी पवित्र झाली आता पहिले सरकार फिर मंदिर जय श्रीराम #लाचारसेना
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 18, 2019
शिवसैनिकांनी उद्धव साहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही तो न्यायालयात सुद्दा टिकेल अस मला मूळचा शिवसैनिक असलेला वकील सांगत होता
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 19, 2019


