Share

‘राज ठाकरे ज्यांचा इतिहास वाचतात त्यांच्या लिखानामुळेच महाराष्ट्रात दंगली घडल्या’, संभाजी ब्रिगेडचा आरोप

Published On: 

मुंबई: राज ठाकरे ज्या लोकांचा इतिहास वाचत आहेत, त्यांच्या लिखानामुळेच महाराष्ट्रात दंगली घडल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले इतिहास लेखन हे दंगलीचे स्त्रोत पसरवणारे लिखाण आहे. त्या माध्यमातूनच महाराष्ट्रात दंगली झाल्या होत्या. असा आरोप संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे. पण आपण जरी दंगली घडवत असला तरी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाच्या विचारधारेमुळे या महाराष्ट्रातील दंगली थांबलेल्या आहेत.

दरम्यान संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे, असे म्हणत आखरे यांनी राज यांना चर्चेचं निमंत्रण दिलं असून आम्ही खरा इतिहास समोर आणून दाखवू असे म्हटले आहे.

काहीही माहिती नसताना पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविषयही काहीही वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे. या महाराष्ट्रामध्ये इतिहासाचं विकृतीकरण थांबवून सामाजिक, शैक्षणिक धार्मिक द्वेषवादाचं उच्चाटन करण्याचं काम खेडेकरांच्या विचारांच्या प्रबोधनातून झालं आहे. सर्व बहुजन समाजामध्ये खेडेकर आणि त्यांच्या लिखाणाबद्दल आदर आहे. आपण प्रतिगामी व्यवस्थेचे वाहक आहात. असे म्हणत राज ठाकरेंनी वाटेल ते बोलून महाराष्ट्राला वेठीस धरु नये असे आवाहनही आखरे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!