🕒 1 min read
नांदेड : नांदेड जिल्ह्यात दुष्काळ पाहणीसाठी गेले कृषि मंत्री सदाभाऊ खोत यांनी पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चाड्यावर हात ठेवत केली पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्याला या आनंद झाला.
तब्बल एक महिन्यापेक्षाही अधिक काळापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे नुकसानग्रस्त नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पिकांची पाहणी करुन नरसीमार्गे बिलोली तालुक्यात जात होते.
त्यावेळी लोहगाव शिवारात मंत्री महोदयाच्या गाड्याचा ताफा आला असता, रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात एक शेतकरी रब्बीची पेरणी करत होता. हे गाड्याचा ताफा थांबवून सोबतच्या लोकांच्या लक्षात येण्याच्या आत थेट शेतातील औत गाठत शेतकऱ्यांच्या ओटीतील धान्य घेऊन चाड्यावर (पाबरीवर) हात ठेवत पेरणी केली.
यावेळी आमदार राजेश पवार, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पांडूरंग शिंदे, तहसीलदार सुरेखा नांदे, जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार, माणिक लोहगावे व इतर पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
मी मंत्री होऊन तीन वर्ष झाली असली तरी त्या अगोदरची ४९ वर्षे मी शेतात राबलोय. हे संकटाचे दिवस निघून जाऊन या राज्यातला शेतकरी नव्या दमानं, नव्या जोमाने पुन्हा उभं राहून आपल्या चिल्यापिल्यांची काळजी घेईल, असा आशावाद असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1191677312187527169?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191676928274522112?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
