मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील पोसरे येथे दरडग्रस्तांना धनादेशाद्वारे मदत देण्यात आली होती. पण ते चेक दुसऱ्याच दिवशी परत घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका होऊ लागली आहे.
रयतचे सर्वेसर्वा आ. सदाभाऊ खोत यांनी देखील याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. आपल्या ट्वीटच्या मध्यातून त्यांनी ही टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, याला म्हणतात का ठाकरे सरकार व कामगिरी दमदार ? हे तर माहीत होतं शिवसेना प्रसिद्धीसाठी काहीही करू शकते,परंतु एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रसिद्धी मिळवेल हे कधी वाटलं नव्हत. हे कृत्य करून तुम्ही अक्षरशः लोकांच्या दुःखावरती मीठ चोळले. अनिल परब साहेब जनता तुम्हाला माफ करणार नाही असा घणाघाती हल्ला खोत यांनी केला आहे.
दुसऱ्या बाजूला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील राज्य सरकार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.‘रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि नंतर देणार असं सांगितलं असेल तर हे दुर्दैवी आहे. पालकमंत्री आणि हे राज्य सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार आहेत?’ असा सवाल दरेकरांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून लारा दत्ताला ओळखणे झाले कठीण; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
- ‘वर्क फ्रॉम होम, खरेदीला वेळ देणार कोण’! पुण्यात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
- टीम इंडियात रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप
- लेखापाल मारहाण प्रकरण, शिवसेना खा.भावना गवळी अडचणीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
