Share

आरएसएस आंदोलन करणारी नाही तर मनुष्य निर्मितीचे कार्य करणारी संघटना आहे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येच्या प्रलंबित खटल्यावर निकाल दिला आहे. हा निकाल पूर्णपणे रामलल्लाच्या बाजूने लागला आहे. तर मुस्लीमांना ही अयोध्यात 5 एकर स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. त्यामुळे मुस्लीम पक्षकारांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेतून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत या निर्णयाला जय पराजय असे न समजता कोर्टाने जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित खटल्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत. यावेळी त्यांनी भूतकाळ विसरून पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

त्यानंतर भूतकाळ विसरून पुन्हा एकत्र येत आनंद व्यक्त करू असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आंदोलन करणारी संघटना नसून मनुष्य निर्मितीचे कार्य करणारी संघटना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर त्यांना मस्जिद कोणत्या ठिकाणी उभारण्यात यावी, असे विचारले असता हा निर्णय सर्वस्वी कोर्टाचा असल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1193071746229792773?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1193072530417803264?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!