🕒 1 min read
मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. या संपाबाबत बुधवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे दोन मॅरेथॉन बैठका झाल्या. यात पगारवाढीसह अन्य मागण्या मान्य केल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले, मात्र अंतरिम पगारवाढ मान्य नाही आम्हाला विलिनीकरणच हवं आहे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी एसटी कर्मचारी आंदोलनाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत (MLC Sadakhau Khot) आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर आरोप केले आहेत.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ३५० रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून असे ७० हजार कर्मचारी. कर्मचाऱ्यांची लूट, ST संप, कर्मचारी उपाशी नेते तुपाशी, असे ट्विट करत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाना साधला आहे.
350 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून
70000 कर्मचारी
कर्मचाऱ्यांची लूट
ST संप
कर्मचारी उपाशी
नेते तुपाशी— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 26, 2021
आंदोलन शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. ही पगारवाढ नोव्हेंबरपासून देऊ असंही सरकारने म्हटलं. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी अंतरिम पगारवाढ मान्य नाही आम्हाला विलिनीकरणच हवं आहे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये भाजप मंडळ अध्यक्षाची निघृण हत्या
- ‘..हा हल्ला मुंबईच्या नव्हे तर देशाच्या काळजावर झाला’, अदिती तटकरेंची प्रतिक्रिया
- ‘मी आज…’; माजी नगरसेवकाचे वक्तव्य ऐकून एकनाथ शिंदे चकित
- …हा हल्ला दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा- मुख्यमंत्री ठाकरे
- भारतावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला परतवून लावणाऱ्या मुंबईकरांना सलाम- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

