🕒 1 min read
मुंबई : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी (26-11 Mumbai terrorist attack) नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसेच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करत अनेकांनी आदरांजली वाहिली आहे. याच दिवशी पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमवला. या मन हेलावणाऱ्या घटनेला आज १३ वर्ष पूर्ण होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackray) यांनी ट्विट करत शहिदांना आदरांजली वाहिली आहे. ते म्हणाले आहेत की,’२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीर व बळी पडलेल्या नागरिकांना विनम्र अभिवादन.’ तसेच हल्ल्याविरोधात निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत हा हल्ला दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता अशी निर्भत्सना त्यांनी केली आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीर व बळी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. तसेच हल्ल्याविरोधात निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत हा हल्ला दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता अशी निर्भत्सना केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 26, 2021
दरम्यान, भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील ट्विट करत शहिदांना आदरांजली वाहिली असून आजच्या दिवशी भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. जो सार्वभौमत्वावर हल्ला होता. या हल्ल्यादरम्यान मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणी टार्गेट करण्यात आले होते. ज्याच्या आधारे केवळ मुंबईलाच नाही तर संपूर्ण आंतराष्ट्रीय समाजाला पराजित करण्याचं लक्ष्य होतं. ज्या प्रकारे हा हल्ला झाला होता. तो कोणालाच विसरता येण्यासारखा नाही. २६-११ हल्ला हा नागरिकांनी संपूर्ण भारतावरील हल्ला मानला होता, असे ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल
- मागील सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरारीचे मुख्य कारण- संजय राऊत
- राजनाथ सिंह यांनी केला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या ‘त्या’ फोटोचा खुलासा
- आज विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्याची आत्यंतिक गरज- शरद पवार
- हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
