Share

‘दलितांच्या मतांवर आरपीयचाही हक्क’ ; उत्तरप्रदेशात भाजपकडे केली ‘इतक्या’ जागांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाकडे 8 ते 10 जागांची मागणी केली आहे. आठवलेंनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन आगामी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांवर चर्चा केली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष या नात्यानं आठवलेंनी या राज्यांमध्ये विधानसभा जागांची मागणी भाजपाकडे केली आहे. त्यांनी सर्वात जास्त 8 ते 10 जागा उत्तर प्रदेशात मागितल्या आहेत. तर उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर राज्यात 2 ते 3 जांगाची मागणी केली आहे. दलितांच्या मतांवर आरपीयआयचाही हक्क आहे, असे मत यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक राज्यात जनाधार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. म्हणून त्यांनी भाजपकडे आगामी निवडणुकीसाठी जागा मागितल्या आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये बसपची मतं खाल्ल्यास भाजपलाच फायदा होईल, दलितांच्या मतांवर आरपीयचाही हक्क असल्याचे आठवले यांनी नमूद केले. नड्डा यांनी जागावाटपाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आठवले यांनी सांगितले.असादुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष उत्तर प्रदेशमध्ये 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यांनी 200 जागांवर निवडणूक लढवावी असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच एमआयएमने उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवल्यास भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कुठलेही नुकसान पोहोचणार नाही असा दावाही आठवले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!