🕒 1 min read
नागपूर : ‘आपल्या देशात ज्याला त्याला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार कुणी करत नाही आणि समजून घेत नाही. मुळात सरकारी नोकऱ्याच नाही तर त्यात आरक्षण कुठून देणार? आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय झाला आहे. आपल्याकडच्या राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे. मागास असणे ही पूर्णपणे राजकीय बाब झाली आहे,’ असे रोखठोक मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात व्यक्त केले.
वनराई फाउंडेशनच्या वतीने कमानी ट्यूब्जच्या अध्यक्षा पद्मश्री कल्पना सरोज यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी गडकरी म्हणाले, तंत्रज्ञानामुळे रोजगार व पैसा मिळतो. येणारा काळ हा ड्रोन तंत्रज्ञानाचा आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणारा उद्योजक होऊ शकतो आणि त्याचा कोणत्याही जात, पंथ, धर्म, भाषेशी संबंध नाही. व्यक्तीच्या चांगुलपणाचा व गुणवत्तेचा कशाशी संबंध नाही. आपल्याकडे महाविद्यालये आहेत, पण उद्योजकता शिकवणाऱ्या संस्था नाहीत. प्रत्येकाला शाळा किंवा कॉलेज हवे हसते. दुसरा व्यवसाय करण्याची तयारी नसते. डॉ. सरोज यांच्यासारख्या यशस्वी उद्योजिकेने दलित समाजातील १०० तरुणींना उद्योजक म्हणून घडवावे. अशा प्रयत्नांतूनच आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित होईल, असेही गडकरी म्हणाले.
दरम्यान, मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आरक्षण कुणामुळं गेलं हे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. मोर्चे आणि विभागीय मेळावे सुरू आहेत. खासदार संभाजीराजे भोसले यांनी नुकताच या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे व पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मांडलेलं मत महत्त्वाचे मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
