Share

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने घेतला ‘हा’ निर्णय !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :कोरोना संकट अजूनही निवाराले नसल्याने एकीकडे अर्थव्यवस्थेवर कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये करण्यात आलेल्या लोक डाऊन मध्ये झालेल्या परिणामांतून अर्थव्यवस्था हळूहळू सावरते आहे. या काळामध्ये बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे महागाई वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय बँकेकडून व्याजदरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. तर यावेळी डिसेंबर आणि जानेवारीसाठी जाहीर होणाऱ्या शुक्रवारच्या रिझव्र्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण बैठकीत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरामध्ये सुधारणा होण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. मागील दोन महिन्यात किरकोळ बाजारात झाली महागाई वाढ चिंताजनक आहे. दुसरीकडे अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत असली तरी तूर्त व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय आज पतधोरण समितीने घेतला. रेपो दर ४ टक्के स्थिर असून सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले.

दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये सुधारणा झाली असली तरी या आढावा बैठकीत व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता धूसर असल्याचे अंदाज जाणकारांनी यापूर्वी व्यक्त केले होते. यानुसार बँकेने रेपो दर ४ टक्क्यांवर कायम ठेवला.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले. मागील दोन बैठकीत आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवला होता.

मागील दोन महिन्यात किरकोळ महागाईमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा आलेख तूर्त चिंताजनक आहे, असे दास यांनी सांगितले. मात्र खरिपातील शेतमाल बाजारात आल्यास आणि हिवाळी भाजीपाल्याची आवक वाढल्यास महागाई आटोक्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सद्यस्थितीत किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित स्तरापेक्षा वरच्या पातळीवर आहे, असे त्यांनी सांगितले. सप्टेंबर २०२०मध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचा दर नकारात्मक राहिला आहे. मात्र अर्थव्यवस्थेची झपाट्याने सुधारणा होत आहे, असे त्यांनी सांगितले. महागाई नियंत्रण आणि विकासाला चालना देण्याबाबत बँक कटिबद्ध आहे. चालू तिमाहीत महागाई दर ६.८ टक्के राहील तर चौथ्या तिमाहीत तो ५.८ टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे.

अर्थव्यवस्थेची सुधारणा आणि करोना प्रतिबंधात्मक लसीची प्रगती यामुळे विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. २०२०-२१ या वर्षाचा विकासदर उणे ७.५ टक्के राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. याआधीच्या पतधोरणात विकासदराचा उणे ९.८ टक्के अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!