Share

“दोन तीन महिने ब्रेक घेऊन..”; रवी शास्त्रींचा विराटला सल्ला

Published On: 

मुंबई : विराट कोहलीने उरलेल्या कसोटी कर्णधारपदाचा हि राजीनामा दिल्यानंतर त्याला सगळीकडून सल्ले मिळत आहेत. नेतृत्व सोडल्यानंतर त्याने फलंदाजीवर लक्ष द्यावे असे काहींचे म्हणणे होते. मात्र कर्णधार असताना त्याचे माजी सहकारी असणारे कोच रवी शास्त्रींनी त्याला हटके सल्ला दिला आहे.

लेजंड लीगसाठी रवी शास्त्री ओमानमध्ये आहे. तिथे शोएब अख्तर हि आहे. शोएबसोबत मुलखतीत बोलताना रवी शास्त्री म्हणाले ” विराटने कर्णधारपद सोडणे माझ्यासाठी धक्कादायक होते. त्याने नक्कीच दोन वर्ष कॅप्टन्सी केली असती एक मालिका हरले म्हणजे काय झाले. ” सोबतच त्यांनी विराटला एक हटके सल्ला हि यावेळी दिला ” मला वाटते त्याने दोन तीन महिने ब्रेक घेऊन कुठे तरी फिरायला जावे , जेणेकरून तो माइंड फ्रेश करून पुन्हा एकदा त्याचा खेळावर लक्ष केंद्रित करू शकेल. कारण तो जसा खेळाडू आहे तो क्रिकेटवर वर्चस्व गाजवणार आहे.”

शोएबच्या युट्युबसाठी त्यांनी हि मुलाखत दिली आहे. यावेळी केवळ विराट नाही तर त्यांनी रोहित आणि धोनीचेही तोंड भरून कौतुक केले. माहीबद्द्दल बोलताना ते म्हणाले “तो खूप संतुलित आहे. मी त्याचा सारखा माणूस कुठेही पाहिला नाही. त्याचाकडे फोनही नसतो. अजून माझ्याकडे त्याचा नंबरही नाही , पण मला माहितीये त्याला सापडायचे असेल तर फोनची गरज नाही.” रवी शास्त्रींनी दिलेल्या सल्ल्याचा फायदा विराटला होऊ शकतो. मात्र सध्या विराटचे संपूर्ण लक्ष वेस्ट इंडीज विरुद्ध मालिकेकडे लागले आहे. तर त्याचे चाहते त्याच्या ७१व्या शतकाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!