🕒 1 min read
अशातच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप (Virendra Jagtap) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं. राज ठाकरे यांच्या गोरेगाव येथील सभेनंतर वीरेंद्र जगताप यांनी सावरकर देशाला कलंक होते असं वादग्रस्त विधान अमरावतीत केलं. दरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन देखील केले आहे. वीरेंद्र जगताप यांच्या या वक्तव्यानंतर भाजप व काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे.
भाजपने नांदगाव खंडेश्वर येथे वीरेंद्र जगताप यांचा निषेध करत पुतळा जाळण्यात आला. या वादात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी सुद्धा उडी घेतली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणारे वायफळ वीरेंद्र जगताप (Virendra Jagtap) यांच्या यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बसतात, असं त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर सावरकरांबद्दल खालच्या स्तराचे वक्तव्य करतात याला उद्धव ठाकरे समर्थन करतात का? असा खोचक सवाल रवी राणा यांनी केला. तसेच काँग्रेसच्या वतीने उद्धव ठाकरे माफी मागणार का?, असा सवालही रवी राणा यांनी उपस्थित केलाय. यावर ठाकरे गटाकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.
- Jitendra Awhad | “जेम्स लेनचं समर्थन करणाऱ्यांची माफी म्हणजे…” ; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार!
- Hair Care Tips | हिवाळ्यामध्ये केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहात?, तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Aditya Thackeray | “…हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
- Vijay Deverakonda | अभिनेता विजय देवरकोंडा ED च्या धारेवर, तब्बल 12 तास चौकशी
- Chandrakant Khaire | “फुटू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना आणखी 5 कोटी दिले”; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
