रत्नागिरी : कोरोनाला रोखण्यासाठी तब्बल १ महिना झाला संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोना रुग्नांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे आपल्या आरोग्य रात्रंदिवस काम करत आहे.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सहा महिन्याच्या बाळाचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. या अहवालातून त्याला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे रत्नागिरीत आता एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही.
दरम्यान, १९ मार्चला रत्नागिरीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून एकूण सहाजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील शृंगारतळीचा पहिला रुग्ण, राजीवडा येथील दुसरा रुग्ण पूर्ण बरे झाले. खेड येथे एका रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आला आणि त्याचवेळी त्याचे निधन झाले.
मिरज येथे पाठविण्यात आलेल्या रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल जिल्ह्यात प्राप्त होत आहेत. रात्री उशिरा सोळा जणांचे अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याने कोरोना विरुधातील युद्ध अखेर जिंकले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

