🕒 1 min read
वर्धा : कांद्यावर देशात असलेली निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी वर्ध्यात खासदार रामदास तडस यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. खासदाराला एक किलो कांदा भेट देत केंद्र शासनाच्या निर्यातबंदीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने निर्यातबंदी न हटविल्यास खासदार रामदास तडस यांनी शेतकरी हितासाठी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
देशात कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे हीत केंद्र सरकार लक्षात घेत नाही. एकीकडे जीवनावश्यक वस्तूचा कायदा केला जातो, तर दुसरीकडे निर्यातबंदी लादली जाते. लवकरात लवकर निर्यातबंदी उठविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विविध घोषणा देत खासदार तडस यांच्या घराजवळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी खासदारांना कांदा भेट देऊन निवेदन दिले. आंदोलनात शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरणे, सतीश दाणी, सचिन डाफे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
- अजितदादा म्हणतात वरिष्ठांचं ऐकूनच ‘ते’ ट्विट डिलीट केलं…
- निवडणूक निकालानंतर कुठेच नसलेले काँग्रेस व राष्ट्रवादी यांना सत्तेची लॉटरी- राम शिंदे
- ‘गोपीचंद पडळकरांच्या दादागिरीला भीक घालणार नाही’
- अशा रुग्णांची करा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी, या ग्रामीण क्षेत्रात होतेय मागणी
- शेतकऱ्यांचे १०० टक्के माफ करा, या सभापती महोदयांनी धाडले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
