मुंबई : आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआय व इडीच्या रडारवर असलेल्या वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्यासाठी राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी एक परवानगीचं पत्र दिलं होतं.
कोरोनामुळे देशात लॉक असूनही नियम भंग करून खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करणारे वाधवान यांच्या वरून आता राजकारण चांगलाच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र याच घटनेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
याबाबत ट्विटकरत शेट्टी म्हणतात, ‘न्यूझीलंड च्या राष्ट्राध्यक्षांनी लॉक डाऊन चा नियम मोडल्याबद्दल आपल्या आरोग्य मंत्र्यांचा माफीनामा फेटाळून त्यांना पदावनती लादली !उद्धवजी आम्ही तुमच्याबरोबर आहोतच पण गृह सचिव अमिताभ गुप्ता यांचेवर कठोर कारवाई चे संकेत दिले असते तर तुमचा कणखरपणा दिसला असता’.
न्यूझीलंड च्या राष्ट्राध्यक्षांनी लॉक डाऊन चा नियम मोडल्याबद्दल आपल्या आरोग्य मंत्र्यांचा माफीनामा फेटाळून त्यांना पदावनती लादली !उद्धवजी आम्ही तुमच्याबरोबर आहोतच पण गृह सचिव अमिताभ गुप्ता यांचेवर कठोर कारवाई चे संकेत दिले असते तर तुमचा कणखरपणा दिसला असता @ANI, @CMOMaharashtra
— Raju Shetti (@rajushetti) April 12, 2020
दरम्यान, ‘सामान्य माणसाला घराबाहेर पडायला परवानगी नसताना श्रीमंताच्या सहलीला थेट पास मिळतो आहे, अशी परिस्थिती आहे. अशी परवानगी देण्याचं धाडस सचिवात नाही. या प्रकरणाचं सत्य काय आहे हे जनतेसमोर यावं,’ अशी मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील केली होती.


