मुंबई : मी मास्क घालतच नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर केलं होत. तसंच नाशिकच्या दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक यांना चेहऱ्यावरील मास्क उतरवण्यास सांगितलं होतं. पण मास्क न वापरणाऱ्या सर्व सामान्य लोकांवर जशी कारवाई होते. त्या पद्धतीने नेत्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
‘राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल. त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील,’ अशी मिश्किल टिप्पणी रामदास आठवले यांनी केली.
नुकतंच सातारा येथे रामदास आठवलेंची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले. ‘राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई होते, त्या पद्धतीने नेत्यावर देखील झाली पाहिजे,’ असे रामदास आठवले म्हणाले.
तर आज राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या भूमिकेमुळे राज्यात कोरोना वाढला असं म्हणत अॅड रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- नाणार प्रकल्पग्रस्त जाणार ‘कृष्णकुंज’वर; राज ठाकरेंनी दिलं भेटीचं निमंत्रण
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनीच महापालिकेला घातला कोट्यवधींचा गंडा ?
- परिवर्तन बंगालमध्ये नाही तर दिल्लीत होणार; ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांवर पलटवार
- शेतीमालाच्या रक्षणासाठी एक नवी शक्कल; शेतकरी बनला स्मार्ट


