Share

केरळनंतर उत्तराखंडमध्ये पावसाचे रौद्ररुप; पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी बातचीत

Published On: 

🕒 1 min read

देहरादून : केरळनंतर आता उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. केरळमध्ये भूस्खलनाच्या घटनेत २२ जणांनी प्राण गमवले अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. ही परिस्थिती निवारत असताना आता उत्तराखंडमध्येही भयाण स्थिती उद्भवली आहे. अनेक घरे पाण्यात बुडाली असून नागरिक घराच्या छतावर बसून मतद तागताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीवर चर्चा केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, राज्यात मुसळधार पाऊस आणि पूर-परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमित सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तत्पूर्वी, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. ते राज्याच्या सचिवालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील विभक्त ठिकाणी अतिवृष्टीसह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून बद्रीनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे आणि बद्रीनाथकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!