नवी दिल्ली : कारोना रुग्ण संख्येच्या वाढीबाबत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सध्या भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी अनेक देश धावले आहेत. अनेक देशांमधून आरोग्य साहित्य भारताला मिळत आहे. मात्र, मोदी सरकारने त्यांचे काम केले असते तर ही वेळच आली नसती अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
या संबंधी राहुल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केलीय. राहुल यांनी लिहिले की, ‘विदेशी मदत मिळण्यावर केंद्र सरकार वारंवार स्वत:ची छाती ठाेकत असून हे निराशाजनक आहे. जर मोदी सरकारने त्यांचे काम केले असते तर, ही वेळच आली नसती.’
विदेशी सहारा पाने पर केंद्र सरकार का बार-बार छाती ठोकना निराशाजनक है।
अगर मोदी सरकार ने अपना काम किया होता, तो ये नौबत ना आती।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 10, 2021
भारतात कोरोना रुग्ण संख्या वाढण्याला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी या आधी देखील केला होता. विदेशातून मतद मागण्याची वेळ भारतावर आलीच नसती, असेही राहुल यांनी म्हटले आहे. युरोप अमेरिकेसह भारतातील शेजारी देशांनीही भारताला मदत केली आहे. यामध्ये चीनकडूनही भारत मदत स्विकारत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- मातृदिनादिवशी धनश्रीने शेअर केला आईचा भन्नाट डान्स ; लिहिली भावनिक पोस्ट
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’


