Share

‘शेतकऱ्यांपुढे इंग्रज टिकू शकले नव्हते, मग मोदी कोण लागून गेलेत?’

Published On: 

🕒 1 min read

जयपूर : दिल्लीच्या सीमेवर मागच्या 78 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी हनुमानगडमधील एका सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमिनी कुणा एकाच्या हातात जाऊ नये, हाच काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण नव्या कायद्यांमध्ये उलट प्रयत्न होत आहेत. देशातील शेतकऱ्यांसमोर इंग्रजांचाही निभाव लागला नव्हता, मग मोदी कोण लागून गेले आहेत?, असेही ते म्हणाले.

सभेदरम्यान राहुल गांधी म्हणाले, ‘मोदीजी म्हणतात आम्हाला शेतकऱ्यांशी संवाद साधायचाय, तुम्हाला काय बोलायचंय? कृषी कायदे रद्द करा, शेतकरी तुमच्याशी चर्चा करतील. तुम्ही (मोदी) त्यांची जमीन, भविष्य हिरावून घेत आहात आणि अशा परिस्थितीत त्यांच्याशी बोलू इच्छिता. आधी कायदा मागे घ्या, मग बोला.’

राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘या तीन कायद्यांचा खरा हेतू काय आहे? मोदीजी ते का आणत आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. शेती हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय आहे, कारण यामुळे कोट्यवधी लोकांना अन्न मिळते. भारतातील 40 टक्के लोकसंख्या हा व्यवसाय चालवते. शेती कोणाच्याही हातात जाऊ नये यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!