टीम महाराष्ट्र देशा : नुकताच भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद मिळवलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे काँग्रेसमधील सहकारी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या राज्यातील दयनीय अवस्थेला चव्हाण जबाबदार असल्याचं ते म्हणाले आहेत.
मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर विखे पाटील प्रथमच ते आपल्या लोणी या मूळगावी गेले होते. त्यावेळी त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात काँग्रेसच्या जागांची संख्या ८२ वरुन निम्मी म्हणजे ४२ झाली. त्यामुळे त्यांनी माझी काळजी करु नये. आधी पक्षाचा विचार करावा, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली .
दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी राज्यात पडलेल्या दुष्काळवर बोलताना, दुष्काळी भागांची दाहकता बघून सरकार अपेक्षेपेक्षा जास्त मदत करत आहे,” अस म्हणाले. “विरोधात असताना माहितीच्या आधारे वरिष्ठ मंडळी काम करण्यास सांगत. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकार चांगले काम करतय” असंही राधाकृष्ण विखे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

