🕒 1 min read
मुंबई: लखीमपूरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटायला निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना तेथील प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यावेळी पोलिसांशी त्यांची झटापटही झाली. त्यांना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे. गेल्या ३० तासांपासून प्रियांका गांधींना बंदिस्त ठेवले आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी योगी सरकारला संतप्त सवाल केला आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींना गेल्या ३० तासांपासून कोठडीत ठेवले आहे. मग मंत्र्याच्या मुलाला अजून अटक का नाही? असा संतप्त सवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. तर ज्यांनी अन्नदात्यांना कारने चिरडले त्यांना अटकही झाली नाही. आणि त्यांचे अश्रू पुसणाऱ्या श्रीमती प्रियंका गांधी यांना 30 तासांपासून कोठडीत ठेवलेय. ना गुन्हा सांगितला, ना न्यायालयात सादर केले. हेच आहे काय योगी-मोदींचे राम राज्य? असा सवाल कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत केला आहे.
प्रियंका जी को 30 घंटे से हिरासत में रखा गया है, मंत्री के बेटे को अब तक गिरफ्तार क्यों नहीं?#लखीमपुर_किसान_नरसंहार pic.twitter.com/KCa6QovAEE
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) October 5, 2021
दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपुर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये तर जखमींना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र या घटनेनंतर देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर प्रियांका गांधींच्या अटकेनंतर भाजपवर कडाडून टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात
- घरी जा, गुगलवर ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र’ सर्च करा; खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले काम
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
