Share

केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : सध्या राज्यभरात धाडसत्र सुरु असून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते यामध्ये अडकले आहेत. त्यामुळे या धाडसत्रावरून केंद्र सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीकास्त्रांचा वर्षाव केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की,’केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, धाडी टाकायच्या, फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायची, सध्या राज्यात हे सगळं सुरु आहे. पण सगळं झाल्यावर कुणालातरी शिक्षा झाली आहे का? एक दिवसाची जरी शिक्षा झाली असती तर आम्ही मानलं असतं. पण सगळं तोडपाणी करण्याकरता हे सगळं चाललं आहे. केवळ आपल्या पक्षात घेण्यासाठी मोदी सरकारकडून नेत्यांना भीती घालण्याचे काम सुरु आहे’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, याच धाडींसंदर्भात पिंपरी-चिंचवडमध्ये बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते की,’केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!