Share

‘भाजपच्या  तोंडाला रक्त लागलं आहे, अनेक मंत्री घोडेबाजार करत आहेत’

Published On: 

जयपूर- राजस्थान मध्ये सध्या मोठे राजकीय संकट पाहायला मिळत आहे. युवा नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय अस्थिरता त ठिकाणी निर्माण झाली आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेला तमाशा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंद करावा असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.

अशोक गहलोत म्हणाले, ‘भाजपचा घोडेबाजाराचा खेळ खूप मोठा आहे.त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश ते यशस्वी झाल्यामुळेच ते आता राजस्थानमध्ये प्रयोग करत आहेत. देशाचं गृहमंत्रालयच या कामात सहभागी आहे. धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांचा या घोडेबाजारात सहभाग आहे.’भाजपाकडून सुरु असलेला हा घोडेबाजार अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. कर्नाटक आणि मध्यप्रदेशात राबवलेला प्रयोगच इथे केला जातो आहे असाही आरोप गेहलोत यांनी केला.

विधानसभेचं अधिवेशन घेण्यासंबंधीची घोषणा झाल्यानंतर घोडेबाजाराला उत आला आहे. सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या खरेदी विक्रीचा खेळ सुरु आहे. या सगळ्या मागे भाजपाच आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीनींच हा सगळा तमाशा आणि घोडेबाजार बंद करावा असं म्हणत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!