🕒 1 min read
नवी दिल्ली- भारतात आजमितीस एकूण सक्रिय रुग्णसंख्या 1.39 लाख (1,39,637) आहे. ही संख्या भारताच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 1.28% इतकी आहे.गेल्या 24 तासांत 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत 5,000 पेक्षा कमी सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या त्रिपुरा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीमध्ये प्रत्येकी केवळ दोन सक्रिय रुग्ण आहेत.
भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 77% (76.5%) रुग्ण केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यात मिळून आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी 74.72% रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात मिळून आहेत.गेल्या 24 तासात 18 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात एकही मृत्यूची नोंद नाही. यात आसाम, राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड, उत्तराखंड, मणिपूर, नागालँड, लक्षद्वीप, मेघालय, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटे, लडाख (केंद्रशासित प्रदेश) मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे.
तसेच, गेल्या आठवड्यात दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. यात अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली, लडाख (केंद्रशासित प्रदेश), लक्षद्वीप, मणिपूर, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.
15 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत, देशभरात कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण केलेल्या आरोग्यसेवा आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ 83 लाखांवर पोहोचली आहे.आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 1,73,729 सत्राद्वारे 82,85,295 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 59,88,113 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना (पहिला डोस), 24,561 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना (दुसरा डोस) आणि 22,72,621 आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (पहिला डोस) समाविष्ट आहे.
ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण केले आहेत त्यांना कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस देण्याची सुरुवात 13 फेब्रुवारी, 2021 रोजी झाली.लसीकरण मोहिमेच्या 30 व्या दिवसापर्यंत (14 फेब्रुवारी 2021) 877 सत्रांमध्ये एकूण 21,437 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी 20,504 लाभार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. तर 933 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस मिळाला.
देशात लसीकरण मोहिमेत दिवसेंदिवस चढता आलेख पाहायला मिळत आहे.भारतात लसीकरण झालेल्या एकूण लाभार्थीपैकी 69% लाभार्थी 10 राज्यातील आहेत. एकट्या उत्तर प्रदेशातच 10.4% (8,58,602) लाभार्थी आहेत.आज भारतातील बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 1.06 कोटी (1,06,21,220) वर आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.29% आहे.
नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 79.5% हे 6 राज्यातील आहेत.केरळमध्ये दैनंदिन नव्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक 4,692 (जवळजवळ 50%) जी सर्वाधिक नोंदली गेली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 1,355 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल कर्नाटकात 486 रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासांत 11,649 नवीन दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.दैनंदिन नवीन रुग्णांपैकी 86.4% रुग्ण 6 राज्यांमधील आहेत.केरळमध्ये दैनंदिन रुग्णांची नोंद सर्वाधिक 4,612 आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 4,092 तर तामिळनाडूमध्ये 470 नवीन रुग्ण आढळले आहेत.गेल्या 24 तासांत 90 मृत्यूची नोंद झाली.दररोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये सहा राज्यांचा 80% वाटा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (40) मृत्यू म्हणजे दैनंदिन मृत्युसंख्येच्या 44.44% आहे. त्याखालोखाल केरळमध्ये दररोज 15 मृत्यू तर तामिळनाडूमध्ये 6 लोकांचा मृत्यूची नोंद आहे.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- पहिल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन
- आदिवासी भिल्ल समाजातील लोकांचे प्रश्न मार्गी लावणार-संदिपान भुमरे
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- पूजा चव्हाण प्रकरणात तपास करणारे पोलीसच दबावात आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
