नवी दिल्ली : राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरु आहे. राज्यपाल यांनी राष्ट्रपतीकडे अहवाल सादर केला होता, कारण आज संध्याकाळी ५.३० वाजता गृहमंत्रालयाची पत्रकार परिषद आहे. त्या पत्रकार परिषदेत अजय कुमार भल्लाहे माध्यमांशी बोलणार आहेत.
राज्यात सत्ता स्थापन होईल अशी चिन्हे काही दिसत नाहीत. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा न मिळाल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यास आमंत्रण दिले आहे. राज्यपालांनी आपणास अपूर्ण वेळ दिले हे शिवसेनेचा मत आहे. त्यामुळे शिवसेनेनी कोर्टात धाव घेतली आहे.
राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यास आमंत्रण दिले आहे, पण राष्टवादनी वेळ वाढवून मागितला होता. इकडे राज्यपाल यांनी राष्ट्रपतीकडे अहवाल सादर केला आहे, राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1194198670842851328?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1194209559872598016?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1194179019047985153?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

