Share

…तर २०२४ मध्ये भाजपला पराभूत करता येईल- प्रशांत किशोर

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी भाष्य केले आहे. तसेच विरोधी पक्षांची एक आघाडी उभारण्यासाठी आपण मदत करु इच्छितो, असेही यावेळी ते म्हणाले आहेत.

यासंदर्भात काल(२३ जाने.) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रशांत किशोर म्हणाले की,’विरोधी पक्षांची एक आघाडी उभारण्यासाठी मी मदत करु इच्छितो. तसेच ही आघाडी २०२४ मध्ये भाजपाला पराभूत करु शकते’, असेही प्रशांत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, पुढील महिन्यामध्ये पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी २०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणारी आघाडी बांधता येईल.’

दरम्यान, पुढे सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण सांगत प्रश्न किशोर म्हणाले की,’तुम्ही जर बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा विचार केल्यास लोकसभेच्या जवळजवळ २०० जागा आहेत. तरी देखील भाजप येथे केवळ ५० च्या आसापासच जागा जिंकू शकला आहे. बाकी राहिलेल्या ३५० जागांपैकी भाजप कोणासाठी काहीच सोडत नाहीय,’ असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!