Prasad Lad | मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर पर्यटनमंत्री तथा भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेशी केली. हे वाद मिटत नाहीत तोवरच भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचं विधान प्रसाद लाड यांनी केलं आहे. “हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं प्रसाद लाड म्हणालेत.
राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. प्रसाद लाड यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी, अशी मागणी होत आहे. लाड यांच्या विधानाचे पडसाद उमटत असून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 4, 2022
‘भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे,’ असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”; संजय राऊत असं का म्हणाले?
- Sanjay Raut | “संजय राऊतांनी शिवसेनेचं वाटोळ केलं…”, एकनाथ शिंदे गटाचा घणाघात
- Gulabrao Patil | “उदयनराजेंनी आंदोलन करू नये”, राज्यापालांविरुद्ध गेलेल्या उदयनराजे भोसलेंना गुलाबराव पाटलांची मागणी
- Sushma Andhare | “आमच्याकडे एक सुशी ताई आहेत…”, सुषमा अंधारेंवर राजू पाटीलांचं टीकास्त्र
- Abdul Sattar | “युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी…”, अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

