🕒 1 min read
नागपूर : जगात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले कारण गेली 95 वर्ष संघ स्वयंसेवकांनी परंपरा साधनेप्रमाणे पाळल्या आहेत. या संघटनेचे स्वतःचे वेगळे नियम असून, त्यांचा अनादर होईल, असे कुठेही स्वयंसेवक वागत नाहीत. विशेष म्हणजे संघाच्या कार्यक्रमाचे देखील असेच काही प्रोटोकॉल आहेत जे वर्षानुवर्षे पाळल्या गेलेत. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारताच संघाने थेट काही परंपरा बदलण्याचा निर्णय घेतला.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी संघाने सोहळ्यामधील परंपरा बाजुला ठेवली. संघाच्या परंपरेनुसार विजया दशमीच्या कार्यक्रमाला व तृतिया संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे भाषण पहिले होते आणि शेवटी सरसंघचालकांचे होते. मात्र, ही परंपरा बाजूला ठेवत सरसंघचालकांनी पहिले भाषण केले. मुखर्जी यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
प्रणवदांचा हा दौरा चर्चेचा ठरला कारण त्यांनी महाल परिसरातील शिर्के गल्लीतील डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी संघकार्याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी नोंदवहीत मुखर्जी यांनी अभिप्राय नोंदवला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत, अशी नोंद त्यांनी नोंदवहीत केली होती.
औरंगाबाद मध्ये शिवसेनेला खिंडार; ‘सात’ शिवसैनिकांचा मनसेमध्ये प्रवेश !
‘महाराष्ट्राच्या भाविक जनतेनी राज्यभरात केलेला घंटानाद अखेर उद्धव ठाकरे यांच्या कानी घुमला’
मंदिर-मशीदी ईम्तीयाज जलीलांची खाजगी मालमत्ता नाही-शिवसेना आमदार दानवेंंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

