मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी संजय पवार यांच्या पराभवामागील कारण स्पष्ट केले आहे.
“महाविकास आघाडीमध्ये ठरलेल्या कोट्याप्रमाणे अपेक्षित मते मिळाली आहेत. मात्र काही छोट्या पक्षाची व अपक्षांची मते जी अपेक्षित होती ती संजय पवार यांना मिळाली नाही. त्यांची काही नाराजी असणार. मात्र, यावर आघाडीतील ज्येष्ठ नेते चर्चा करतील.”, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “अनिल देशमुख व नवाव मलिक यांना मतदानासाठी जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम झाला. राष्ट्रवादीकडे ५१ मते होती. मात्र आमचा ४२ मतांचा कोटा ठरला होता. तरी मला एक मत जास्त मिळाले. आता ते कुठून मिळाले याचा शोध घ्यावा लागेल.”
महत्वाच्या बातम्या:
- बापरे! देशामध्ये एका दिवसात ८३२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
- PAK vs WI 2022 : बाबर आझमच्या खेळीनं अन् मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीने वेस्टइंडिज गारद
- “देश संविधानानुसार चालतो तुमच्या मानण्या…”, ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला
- वीज कोसळण्यापूर्वीच नागरिकांना ‘या’ अँपवरून मिळणार अलर्ट, वाचा सविस्तर माहिती
- राज्यसभा निवडणुकीत दिसून आलेले ‘लगान’ चित्रपटातील ‘लाखा’ कोण?; सचिन सावंत यांनी केली ‘ही मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

