🕒 1 min read
लातूर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जरी असली तरी देखील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. तसेच गुरुवारी जवळपास १ हाजार रुग्णांनी कोरोनावर मात करून आपल्या घरी सुखरूप गेले असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये वृद्ध आजी-आजोबा देखील आहेत, केवळ योग्य उपचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही होऊ शकत याचं चांगलं उदाहरण या आजी आजोबांनी दाखवून दिलं आहे.
चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी येथील वयोवृद्ध आजी-आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर व नियमित उपचार पद्धतीचा अवलंब करत संसर्गजन्य कोरोना आजारावर मात केली असून त्यांनी सर्वासमोर आदर्श ठेवला आहे. लिंबाळवाडी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमातून कोरोनाची लागण झाली होती. जवळपास एक हजार लोकवस्तीच्या गावामध्ये १९४ जणांची कोरोना चाचणी पाँझीटिव्ह आली होती. यामध्ये वयोवृद्ध संग्राम बिराजदार (वय ८०) व त्यांची पत्नी मथुराबाई बिराजदार (वय ७६) यांना कोरोनाची लागण झाली होती.
वयोवृद्ध असल्याने यांना उपचारासाठी चाकूर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दोघांनी एकमेकांना आधार देत डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करून वेळेवर औषधे घेतली. मथुराबाई यांना काही दिवस ऑक्सिजन लावावा लागला; पण त्यांनी खचून न जाता कोरोनावर मात केली. कोरोनाची बाधा झाल्यानंतर अनेकांचे भीतीने हातपाय गळून जातात. पण या वयोवृद्ध दाम्पत्याने सकारात्मक विचार ठेवले. यांनी केवळ आठ दिवसात कोरोनाला हरविले. या वयात कोरोनाने संक्रमित झाल्याने कुटुंबीय चिंतेत होते.
दोघांनीही न घाबरता या आलेल्या संकटाला तोंड द्यायचे ठरवले व नियमित उपचाराला ते उत्तम प्रतिसाद देत असल्याने आणि मनाने ते जरासेही खचले नसल्याने औषधीचा चांगला परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसू लागला. या सकारात्मक विचाराने ते आठ दिवसात कोरोनातून बरे झाले. त्यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली व या दोघांना सुट्टी देण्यात आली. मथुराबाई व संग्राम बिराजदार या दोघांनी कोरोनाबाधित झाल्यानंतर अंगावर न काढता तपासणी केली. यांनी उपचाराला व्यवस्थित प्रतिसाद दिला. दोघांतील असलेली प्रतिकारशक्ती खूप कामाला आली. यामुळेच लवकर कोरोनावर मात केली. कुणालाही कोरोनाचे लक्षण असतील तर अंगावर न काढता तत्काळ तपासणी करून घ्यावी, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अर्चना पडंगे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा २३ वा दिक्षांत समारंभ ४ मे रोजी
- ‘…त्यामुळे मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका, विनाकारण बाहेर पडू नका’
- १५ दिवसांपूर्वीच कुंभमेळ्यावरुन परतलेले महामंडलेश्वर भागवतानंदगिरीजी महाराज यांचे निधन
- निलेश इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे, काही मदत लागली तर कळव – शरद पवार
- ‘या’ कोविड सेंटरजवळ लागली आग, रुग्णांचा उडाला गोंधळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
