टीम महाराष्ट्र देशा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
‘राजकारण पाचवीलाच पुजलेलं आहे. किती काळ राजकारण करणार?, आयुष्यात दुसरं केलं तरी काय? हा जो काही प्रसंग आहे त्यामध्ये मला राजकारण नकोय, पक्षीय राजकारण इथल्या इथे थांबली पाहिजेत अशा शब्दांमध्ये ठाकरे यांनी विरोधी पक्षाला आपल्या खास शैलीमध्ये सुनावलं आहे.
कोरोनाचं संकट असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न करण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी कोणाचंही नाव न घेता दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यामधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला.
पुढे,’आज एक गोष्ट मी बघितली संपूर्ण देशात वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. मात्र सगळेजण राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. सगळेजण पंतप्रधान मोदींसोबत आहेत आणि मोदी आपल्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
सगळं राज्य सरकारे केंद्र सरकारसोबत आहेत आणि केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत आहे. केंद्र आपल्याला काय हवं ते विचारत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/vkTgkJqohP
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

