टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु शेजारील देश पाकिस्तानला मात्र या निर्णयामुळे झटका बसला होता. या निर्णयामुळे त्यांच्या अनेक नेत्यांची जीभ घसरली होती.
भारत सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. याच शेख रशीद यांच्यावर एका पुरस्कार सोहळ्यामध्ये हल्ला झाला. शेख हे पुरस्कार सोहळ्यासाठी एका बड्या हॉटेलमध्ये पोहचले होते. सोहळ्याच्या दरम्यान शेख सिगरेट फुंकण्यासाठी बाहेर आले असता अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीशी संबंधीत नेत्यांनी घेतली आहे. शेख यांनी काही दिवसांपूर्वी पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांच्याबद्दल बोलताना अपशब्द वापरले होते. त्यामुळेच शेख यांच्यावर आसिफ अली खान आणि पक्षाच्या महिला शाखेच्या समा नमाज यांनी आम्हीच हल्ला केल्याचे म्हटले आहे.
शेख यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताला अनेक वेळा धमकी दिली आहे. त्यांनी भारतात पुन्हा एकदा पुलवामा सारखा हल्ला होईल असं विधान केले होते. तसेच मंत्री फवाद चौधरी यांनी युद्ध करण्याची भाषा केली होती . चौधरी यांनी, ‘संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार रहायला हवे’ असं विधान केले होते.
- दुष्काळाचा शेष जातोय कुठे, अमोल कोल्हे सरकारवर बरसले
- तावडेंबाबत भाष्य करण्याची आता इच्छा नाही : खा. संभाजीराजे भोसले
- जगात अक्षय कुमार चौथ्या स्थानावर; संपत्ती ऐकूण व्हाल थक्क!
- भर सभेत पंकजांची स्तुती केल्याने पुन्हा एकदा राजेश टोपेंच्या पक्षांतराच्या चर्चांना पेव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

