🕒 1 min read
लातूर : जिल्ह्यात मध्यंतरीच्या पावसाच्या खंडामूळे झालेल्या नुकसानीबाबत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाचे विमाधारक शेतकऱ्यास २५%आगाऊ नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे खरीप-२०२१ मध्ये पेरणी झालेले क्षेत्र ४५७८२३ हे. असून संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच म्हणजे ६० महसूल मंडळातून ५०६९८१ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेला आहे.
जिल्ह्यात सुरवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झालेला होता तथापी, जुलै, ऑगस्ट-२०२१ मध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने त्याचा प्रतिकुल परिणाम सोयाबीन पिकावर झालेला होता. कृषी विभागाचे अधिकारी ,विदयापीठ शास्त्रज्ञ आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी समवेत सोयाबीन पिक नुकसानीचा अंदाज घेण्यात आला. त्यानूसार लातुर जिल्हयातील सर्वच तालुक्यातील सर्व म्हणजे साठही महसुल मंडळामध्ये हंगामातील प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली असून (Mid season Adversity) जोखीम लागू झालेली आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय संयुक्त समिती, प्रधान मंत्री पिक विमा योजना यांनी अधिसुचनेव्दारे सोयाबीन पिकाचे संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५%आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई यांना आदेशित केल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळविलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारताचा विक्रम ; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांनी घेतली कोरोना लस
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
- कोरोना इफेक्ट! शिक्षण क्षेत्रावर अवकळा; अकरावी प्रवेशातही गडबड गोंधळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
