अमरावती : त्रिपुराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले होते. अनेकांच्या घरांसह दुकानं, वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराची झालेल्या भागाची पाहणी केली. यावर काँग्रेसनेत्या अॅड. यशोमती ठाकूर (Ad. Yashomati Thakur) यांनी टीका केली आहे.
यशोमती ठाकूर याबाबत ट्विट करत म्हणाल्या, अमरावती तणावासंदर्भात दोन्हीकडच्या लोकांवर कारवाई होत आहे. अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा. आपल्याकडून शांततेचं आवाहन अपेक्षित असताना, वातावरण भडकवण्याचाच प्रयत्न दिसत आहे.
अमरावती तणावासंदर्भात दोन्हीकडच्या लोकांवर कारवाई होत आहे. अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा. आपल्याकडून शांततेचं आवाहन अपेक्षित असताना, वातावरण भडकवण्याचाच प्रयत्न दिसत आहे. (१)
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 21, 2021
१२ तारखेची घटना चुकीची होतीच त्यांचं कोणीच समर्थन केलेले नाही. तसंच १३ तारखेची घटना चुकीची होती, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही मान्य केलेले आहे, या परिस्थितीत शासन योग्य कारवाई करत आहे. महाराष्ट्रात शांतता राहावी म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
१२ तारखेची घटना चुकीची होतीच त्यांचं कोणीच समर्थन केलेले नाही. तसंच १३ तारखेची घटना चुकीची होती, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही मान्य केलेले आहे, या परिस्थितीत शासन योग्य कारवाई करत आहे. महाराष्ट्रात शांतता राहावी म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. #AmravatiUnderControl
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 21, 2021
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय. राज्यभरात एकाच दिवशी, १२ नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित होते असा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा १२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती, असेही फडणवीस यांनी म्हटले. सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- असला सैतान मंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही- सदाभाऊ खोत
- ‘ही तर मद्य विकास आघाडी’; दारू स्वस्त करण्यावर भाजपची टीका
- ‘आघाडीचा अजब कारभार, हरबल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा’
- एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पोलिसांकडून दडपले जातेय; अतुल भातखळकर
- पीएम केअर फंडातून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी मदत करा- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

