Share

युतीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेऊ शकतात; सत्तारांच्या युतीच्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरे संतापले..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: शिवसेना-भाजप युतीचा निर्णय फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेऊ शकतात. याबाबतीत अब्दुल सत्तार यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी त्यांच्या विधानावर टीका केली आहे. अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह सर्वांसमोर येतांना दिसून येत आहे. या आधी देखील खैरेंनी युतीच्या वक्तव्यावरून अनेकांना फटकारल्याचे दिसून आले आहे.

जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या दरम्यान येणाऱ्या समस्या व अडीअडचणीची सोडवण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (दि.४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान भाजप आणि शिवसेना युतीचा पूल फक्त केंद्रीय मंत्री नितिन गडकरीच बांधू शकतात. असे वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

या विशेष भेटीनंतर गडकरीं विषयी सत्तार म्हणाले, नितीन गडकरी हे राजकारणाचे चालते बोलते विद्यापीठ आहे. ते राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांनी पूल बांधण्याचे ठरवल्यास तो कसा जोडायचा हे देखील त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना युतीचा पूल जोडण्याचे काम त्यांनी मनावर घेतले तर ते नक्कीच ते पूर्णत्वाकडे नेऊ शकतात. असे विधान सत्तार यांनी केले होते.

सत्तार यांनी केलेले विधान चुकीचेच

सत्तार यांच्या विधानाचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. खैरे म्हणाले अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याबाबत निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत याविषयी बोलू शकतात. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे विधान हे चुकीचे आहे. अशाप्रकारे खैरेंनी सत्तारांना घरचा आहेर दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

युतीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेऊ शकतात; सत्तारांच्या युतीच्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरे संतापले..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: शिवसेना-भाजप युतीचा निर्णय फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेऊ शकतात. याबाबतीत अब्दुल सत्तार यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी त्यांच्या विधानावर टीका केली आहे. अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह सर्वांसमोर येतांना दिसून येत आहे. या आधी देखील खैरेंनी युतीच्या वक्तव्यावरून अनेकांना फटकारल्याचे दिसून आले आहे.

जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या दरम्यान येणाऱ्या समस्या व अडीअडचणीची सोडवण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (दि.४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान भाजप आणि शिवसेना युतीचा पूल फक्त केंद्रीय मंत्री नितिन गडकरीच बांधू शकतात. असे वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

या विशेष भेटीनंतर गडकरीं विषयी सत्तार म्हणाले, नितीन गडकरी हे राजकारणाचे चालते बोलते विद्यापीठ आहे. ते राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांनी पूल बांधण्याचे ठरवल्यास तो कसा जोडायचा हे देखील त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना युतीचा पूल जोडण्याचे काम त्यांनी मनावर घेतले तर ते नक्कीच ते पूर्णत्वाकडे नेऊ शकतात. असे विधान सत्तार यांनी केले होते.

सत्तार यांनी केलेले विधान चुकीचेच

सत्तार यांच्या विधानाचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. खैरे म्हणाले अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याबाबत निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत याविषयी बोलू शकतात. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे विधान हे चुकीचे आहे. अशाप्रकारे खैरेंनी सत्तारांना घरचा आहेर दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!