नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी व्यापक जनआंदोलन सुरु करण्याचे आणि सर्व तंत्रज्ञान व शैक्षणिक संस्थांनी त्या प्रयत्नात अग्रगण्य भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
आदि शंकराचार्य यांचे जन्मस्थान असलेल्या कालादी येथे आभासी पद्धतीने ‘आदि शंकराचार्य डिजिटल अकादमी’ चे उद्घाटन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की सध्याच्या ज्ञान समाजात माहिती ही मुख्य बाब असून आणि ज्याला त्वरित माहिती मिळते त्याला त्याचा फायदा मिळतो. ‘डिजिटलायझेशन’ हे माहिती प्राप्त करण्याचे एक माध्यम आहे. कोविड -19 साथीच्या आजारामुळे होणाऱ्या अभूतपूर्व अडचणींकडे लक्ष वेधताना नायडू म्हणाले की शाळा बंद पडल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेता येत नाही आणि ऑनलाईन शिक्षण स्वीकारून जागतिक समुदाय या आव्हानाला तोंड देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
ते म्हणाले तंत्रज्ञान आम्हाला अध्यापन व शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची संधी प्रदान करते आणि सतत अद्ययावत राहण्याची गरज व्यक्त करत असून वेगवान बदलणार्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नवीन काळातील मागणीनुसार शैक्षणिक मॉडेल विकसित केले पाहिजे.ऑनलाईन शिक्षणाचे अनेक फायदे सांगत, उपराष्ट्रपती म्हणाले की, यामुळे दुर्गम भागात दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण प्रदान करण्यात मदत होत आहे.हे नियमित अभ्यासक्रमांना उपस्थित राहू शकत नाहीत अशा व्यावसायिक आणि गृहिणींसाठी उपयुक्त आहे.हे सर्व फायदे लक्षात घेता उप-राष्ट्रपती म्हणाले की कोविड साथी नंतरच्या काळातही ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.
कोविड-19 साथीच्या आजारामुळे शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाला आहे यात काही शंका नाही, असे ते म्हणाले.कोविड-19 च्या आधीसुद्धा शिक्षणात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याला वेग आला होता, याकडे लक्ष वेधत नायडू म्हणाले की जागतिक शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रात कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक होत आहे आणि केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षण उद्योजकांनाही मोठी संधी उपलब्ध आहे.कोविड -19 साथीच्या आजाराने आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक-आर्थिक प्रक्रिया कशी चालू ठेवता येईल हे शिकण्यास भाग पाडले आहे ,
या अनुभवातून आपल्याला कळले की डिजिटल पद्धतीने जगण्यासाठी आपण सज्ज आहोत की नाही हा प्रश्न आपल्यासमोर उभा केला आहे. “पायाभूत सुविधांची उपलब्धता, संगणक व स्मार्ट फोन यासारख्या आवश्यक साधनांचा उपयोग, वेग आणि इंटरनेटची उपलब्धता या मुद्दय़ांवर चर्चा झाली असून यावर उपाय शोधणे आवश्यक आहे,” ते पुढे म्हणाले.ऑनलाइन शिक्षण काय देऊ शकते आणि काय नाही या संदर्भात वास्तववादी दृष्टीकोन अवलंबण्याचा इशारा उपराष्ट्रपतींनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत : हुसेन दलवाई
- ‘पवार कुटुंबाचा लोमत्या …जयंत पाटलांचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका’
- भारत भालके यांच्या निधनाने जनतेच्या हाकेला धावून जाणारा लोकनेता हरपला – रामदास आठवले
- धक्कादायक : सद्यस्थितीत भारतातील 70% कोरोनाचे सक्रीय रुग्ण ‘या’ राज्यांमधून
- कंत्राट द्यायचे फडणवीस यांनी आणि हप्ता सरनाईक यांना कसा मिळतो ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

