मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या परदेशी क्रिकेटपटूंचा आपापल्या देशांत परतण्याचा प्रवास सुरू झाला.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यानं घेतलेल्या एका निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकलं आहे. महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या टीममधील सर्व खेळाडू परतल्यानंतरच रांचीला घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई टीमनं दिलेल्या माहितीनुसार ‘विदेशी खेळाडू घरी परतल्यानंतरच घरी जाण्याचा निर्णय धोनीनं घेतला आहे. चेन्नईचे सर्व खेळाडू सध्या दिल्लीमध्ये आहेत. सर्व विदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानानं मायदेशी पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय अहंकाराचा विषय करू नये’
- मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे – खेडेकर
- ‘मराठा समाजाने कोणाच्या दबावाला अथवा दिशाभूल करणाऱ्यांच्या वक्तव्यांना बळी पडू नये’
- ‘मराठा समाजाने ज्या संयम आणि धीराने आजवर हा लढा दिला आहे, तोच संयम या पुढेही दाखवावा’
- ‘सर्वोच्च न्यायालयातील अपयशाची जबाबदारी अशोक चव्हाण व राज्य सरकारला घ्यावीच लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

