🕒 1 min read
मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्देशांपर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच आघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटले, असेही ते म्हणाले आहेत.
यासंदर्भात प्रसाद लाड यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका व्हायला नकोत, राज्य सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असून, आघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे. आघाडी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे’, असे लाड म्हणाले आहेत.
ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका व्हायला नकोत! राज्य सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे!
मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असून, आघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे.
आघाडी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे! @CMOMaharashtra #OBCreservation— Prasad Lad (@PrasadLadInd) March 3, 2022
दरम्यान, याविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून राज्य सरकार कोणतेही उत्तर सुप्रीम कोर्टात देऊ शकले नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा निकाल आला असून अंतरिम अहवालाच्या नावाने कोणताही तर्क नाही, आकडेवारी नाही.’ तसेच ओबीसी समाजाची ही थट्टा आहे. तसेच आरक्षणाशिवाय निवडणुका आम्हाला मान्य नाही, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- कोण आहे अनन्या पांडेचा बॉयफ्रेंड? हातवारे करत घेतले ‘या’ अभिनेत्याची नाव
- १००व्या कसोटी मालिकेपूर्वी कोच द्रविडकडून विराटची प्रशंसा म्हणाला…
- ‘देशाबद्दल आस्था असेल तर राज्यपालांनी ताबडतोब राजीनामा द्यावा’; अमोल मिटकारींनी केली मागणी
- “राज्यपालांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत, अर्थसंकल्पात त्यांचं भाषण नकोय”, धनंजय मुंडेंची टीका
- “ओबीसी समाजाची ही थट्टा”, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
