मुंबई : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. राम मंदिर बांधून कोरोना जाईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही, अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती. भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून भाजप व महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी राष्ट्रवादीसोबतच भाजपनेही घेतली असल्याचे सांगितले जाते.
गुजरात भाजपची जबादारी आता चंद्रकांत पाटलांच्या खांद्यावर…
अयोध्यामधील पुजाऱ्यांनी तीन दिवसीय वैदिक अनुष्ठानांसह तीन ऑगस्टला रामजन्मभूमी साइटवर सोहळ्यासाठी मोठा आराखडा तयार केला आहे. दि. ४ ऑगस्टला रामाचार्य पूजा होईल. यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२:१५ वाजण्याच्या भूमिपूजन आयोजित केले जाईल. मोदी यांची अयोध्या आणि राम मंदिर परिसराची ही पहिली भेट असेल. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापण्याची घोषणा केली होती.
भूमिपूजन सोहळ्यादरम्यान मंदिर गाभाऱ्यासाठी पाच चांदीच्या विटा लावल्या जातील, त्यामध्ये पंतप्रधान मोदी प्रथम वीट लावतील. हिंदू पुराणकथांनुसार ५ विटा ५ ग्रहांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. विश्व हिंदू परिषदेने (VHP) प्रस्तावित केलेल्या आधारे मंदिराची रचना आणि वास्तुकला ठेवण्यात आले आहे. मंदिराची रचना विष्णू मंदिराच्या शहर शैलीची असेल. तर मंदिर गाभारा अष्टकोनी असेल.
विलगीकरणातील व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोनाविषयी वैद्यकीय सल्ला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

