नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर लेहचा दौरा केला. यावेळी जवानांशी संवाद साधताना मोदींनी चीनला थेट इशारा दिला. गेल्या काही काळात विस्तारवादानंच मानवतेचा विनाश केला आहे. आता विस्तारवादाचं युग संपलं असून जग विकासाकडे वाटचाल करत आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी चीनला इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर सीमेचा आढावा घेण्यासाठी लडाख दौरा केला. मीडियाला कसलीही कुणकुण लागू न देता मोदींनी हा दौरा केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लडाख जवळील निमू भागाचा दौरा करत सैनिकांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधत त्यांचं मनोबलही वाढवलं.
Your courage is higher than the heights where you are posted today: Prime Minister Narendra Modi addressing soldiers in Ladakh pic.twitter.com/pLSpPsz45e
— ANI (@ANI) July 3, 2020
जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानंचं मानवतेचा विनाश करण्याचं काम केलं. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या शक्तींचा पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. यासाठी इतिहास साक्ष आहे. सपूर्ण जग आज विस्तावादा विरोधात एकवटलं आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.
ऐकावं ते नवलचं, या ‘गोल्डन मॅन’ने चक्क बनवला सोन्याचा मास्क
अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला – संजय राऊत
पत्नीला 192 कोटी रुपयांची पोडगी देण्यासाठी या’ दिग्गज खेळाडूला करावी लागणार नोकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

