मुंबई : सरलेल्या पावसाळ्यात यंदा राज्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असून धरणे भरून पाणी साठा मुबलक आहे .परतीचा पावसाने शेतकऱ्यांचा खरिप पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले , रब्बी हंगाम पदरात पाडून घेण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दिवशा 12 तास विद्युत पुरवठा सुरुळीत घ्यावा अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे कि परतीचा पाऊस जास्त झाल्याने राज्यात शेतकऱ्यांच्या हातून खरिप हंगाम निघून गेला , सोयाबीन , कापूस , तुर यासारखी पिके पदरात पडली नाही . मोठया प्रमाणार नुकसान होवून शेतकऱ्यांना कवडी मिळालेली नाही .
रब्बी हंगामावर शेतकरी अवलंबून आहे , ज्वारी , गहू , हरभरा यासारखी पिके जोमात आहेत .
एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला मात्र सरकार दिवशा विजपुरवठा करत नाही , रात्री पुरवठा चालू झाल्या नंतर शेतकरी मरणाच्या संकटात धावपळ करतो , पण मोठया प्रमाणावर पाणी वाया जाते , सरकारने शेतकऱ्यांना दिवशा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे . सरकार विज बिल माफ करत नाही , लोकांची दिशाभुल करत आहे , किमान एवढे तरी काम करावे असा टोला कुलकर्णी यांनी मारला.
महत्वाच्या बातम्या
- ठाण्यात पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर मनसेचा राडा; मनसे नेते ताब्यात
- लँडलाइन फोनवरून मोबाइलवर कॉल करताना आता ‘हे’ करणे अनिवार्य असेल
- धक्कादायक : कोरोनाच्या नवीन रुग्णांपैकी 61% रुग्णसंख्या ‘या’ सहा राज्यांमधून
- ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार
- मोदींनी दिएगो मॅराडोनाच्या निधनाबद्दल व्यक्त केले दुःख; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

