मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख यांच्या चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आला. दरम्यान ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी व्हिडीओ शेअर करत आता यानंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला आहे. ‘ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,’ असं किरीट सोमय्या म्हणालेत.
ED ने अनिल देशमुख व त्यांचे सचिव कुंदन आणि पालांडे यांच्या विरोधात वाझे वसुली प्रकरणात गुन्हा, FIR / ECIR नोंदवला आहे. अनिल देशमुख व ग्रुप द्वारा ₹100 कोटींची हेरफेर, भ्ष्टाचाराचा पैसा, मनी लाँडरींग….
पुढचा नंबर अनिल परब चा लागणार @BJP4Maharashtra pic.twitter.com/0XxF40QHpq
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 11, 2021
दरम्यान, ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी भाष्य करत आपल्यावर राजकीय हेतूनेच आरोप केले जात असल्याच भाष्य केलं आहे. ‘मागच्या काळात सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली. आता ईडीच्या माध्यमातून होणार. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होत आहे,’ असं देशमुख म्हणाले. यासोबतच ‘दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मी विधानसभेत मत मांडलं. त्यामुळे केंद्र शासन नाराज असू शकते. म्हणून माझी चौकशी होत असावी. मात्र सत्य पुढे येईल’ असं भाष्य अनिल देशमुख यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कॅबिनेट बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास, आम्ही लढण्यास सज्ज- साष्टपिंपळगाव आंदोलक
- राज्यात कोरोनामुक्तांच्या संख्येत मोठी वाढ, तर नवे कोरोना रुग्णही वाढले !
- मराठा आरक्षण; कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी ८ सदस्यीय समिती गठीत
- निर्बंध काळात अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी – गृह राज्यमंत्री
- राज्य सरकारच्या दिरंगाईने रखडलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे भाजपने केले प्रतिकात्मक उद्घाटन


