Share

कॅबिनेट बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास, आम्ही लढण्यास सज्ज- साष्टपिंपळगाव आंदोलक

Published On: 

साष्टपिंपळगाव : ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा जाणिवपूर्वक खेळखंडोबा केला आणि आता मराठा समाजाला नादी लावण्यासाठी बैठकांचे गुऱ्हाळ सुरू आहे. राज्यपालांकडे जात आहोत, राष्ट्रपतीकडे जाणार ही नुसती बेगडी पळापळ सरकारने सुरू केली आहे. यामुळे आता मराठा समाजाने लढण्यास सज्ज व्हावे. कॅबिनेट बैठकीत मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांबाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा १६ मे पासून समस्त मराठा समाजातील विद्यार्थी तरुण वर्ग ठिय्या आंदोलनात उतरेल. असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल यांनी मंगळवारी (दि.११) महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

पुढे ते म्हणाले, केंद्रातील आणि राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी व पुढाऱ्यांनी एकजुटीने मराठा आरक्षणाचा घात केला असून, तरूणांच्या भविष्यावर नांगर फिरवण्याचे महापाप या राज्यकर्त्यांनी केले आहे. परंतु आता मराठा तरूणांचा तळतळाट उफाळून बाहेर पडणार आहे, त्यांची झळ पुढील काळात राज्यकर्त्यांच्या भविष्याला बसणार आहेच.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारने तातडीने काढावा, कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, एसबीईएस मधून विविध विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात याव्यात, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी, कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या फिस परत करण्यात याव्यात, या मागण्या आज आणि उद्याच्या होणार्‍या कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात याव्यात आणि सरकारने जर हे मान्य नाही केले तर मराठ्यांनी लढण्यास सज्ज व्हावे असे आवाहन मनोज जरांगे पाटिल यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!