नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात जानेवारी २०२० मध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांच्या प्रश्नावर गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लाोकसभेत ही माहिती दिली.
राय म्हणाले, जेएनयू परिसरातील हिंसाचार प्रकरणात तीन प्रकरणांच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष टीम स्थापन केली आहे. या प्रक्रियेत इतर गोष्टींसह परीक्षा, फुटेजचे संकलन, विश्लेषण व संशयितांच्या पडताळणीचा समावेश आहे. गेल्या वर्षी पाच जानेवारी रोजी सुमारे चार तासांपर्यंत काठ्या घेतलेल्या १०० हल्लेखोरांनी जेएनयूमध्ये धुडगूस घातला होता. परिसराच्या आत तोडफोड केली होती. त्यात ३६ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी जखमी झाले होते.
त्याचा तपास दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. जेएनयू प्रकरणात नेमकी अटक का झाली नाही ? असे प्रश्न उपस्थितीत होतात. परंतु ठोस पुरावे नसल्याने अशा प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दीड वर्षांपूर्वीच्या याप्रकरणामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! पूजा चव्हाणने आत्मत्येपूर्वी मद्य प्राशन केले होते; केमिकल अँनालायसेसचा अहवाल
- ‘महाविकास आघाडी सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार?’, प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल
- ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून लारा दत्ताला ओळखणे झाले कठीण; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
- ‘वर्क फ्रॉम होम, खरेदीला वेळ देणार कोण’! पुण्यात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

