टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. तसेच आता कोरोनामुळे होणार्या मृत्युंचीही संख्या आता वाढू लागली आहे.
आता महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पोलीस प्रशासनाकडून कोणताही चौकशी पंचनामा केला जाणार नाही असे आदेश दिले आहे. हे आदेश राज्यात महामारी अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या तरतुदी लागू असेपर्यंत असणार आहे. या बाबतची माहिती ANI या वृत्त विषयक संस्थेने दिली आहे.
‘महाराष्ट्र गृह मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे की महाराष्ट्रात महामारी अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या तरतुदी लागू असेपर्यंत कोणत्याही पोलिस कर्मचार्यांकडून # सीओव्हीआयडी १९ / COVID-19 कोरोना संक्रमित मृत्यूच्या शक्यता असलेल्या घटनांमध्ये कोणतीही चौकशी पंचनामा होणार नाही.’
Maharashtra Home Department has issued an order that there will be no 'Inquest Punchnama' by any Police personnel in possibly #COVID19 infected death cases till provisions of Epidemic Act 1897 and Disaster management Act 2005 are in place in Maharashtra state.
— ANI (@ANI) April 7, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

