🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : सरकार स्थापन करण्यासाठी आज शेवटचा दिवस मात्र अजून भाजप आणि शिवसेनेतील मुख्यमंत्री पदाचा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. अशात केंद्रीयमंत्री नतीन गडकरी यांनी ‘अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही’ अस म्हणत यता वादात अजून पेच निर्माण केला आहे.
“गरज पडल्यास मी मध्यस्थी करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. जेवढी माझी माहिती आहे, त्यानुसार अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही”, असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला नसल्याच सांगितल होत आणि त्यातूनच भाजप-सेनेत वाद सुरु झाला आहे.
जेव्हा बाळासाहेब होते तेव्हादेखील ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे असायचे, असं म्हणत नितीन गडकरी यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असं एकप्रकारे जाहीर केलं आहे. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर भाजपा हायकमांडचा नकार कायम आहे. त्यामुळे आता नितीन गडकरी हे स्वत: उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192710333799878656?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192708718548283392?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192708022155411456?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
