औरंगाबाद : जगभरात तमाम जनता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला तारखेनुसार मोठ्या उत्साहाने साजरी करतात. मात्र, शिवसेनेनी तिथीचा घोळ घालून वेगळी जयंती साजरी करण्याच्या घाट घातलेला आहे. हा अवमान यापुढे आम्ही सहन करणार नाही. त्यांनी तत्काळ यावर पडदा टाकत दुसरी जयंती बंद करावी, अन्यथा शिवसेना नेत्यांच्याही जयंत्या आम्ही तिथीनुसार साजऱ्या करू, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी औरंगाबादेत दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी करण्याच्या वादावरून नितेश राणे यांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना चांगलच फैलावर घेतले.
पहा काय म्हणाले नितेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
