🕒 1 min read
सिंधुदुर्ग : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
सिंधुदुर्गातील ७० पैकी ५७ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या असून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेकडे यापूर्वी असलेल्या तोडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, चुनवरे, दांडेली, कोलगाव सेनेकड़ून हिसकावून घेतल्या आहेत.
सिंधुदुर्गातील आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व पाहता येथील जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत असून शेतकऱ्यांच्या हिताच्या बिलांचे समर्थन जिल्ह्यातील जनता करत आहे हेही दाखवून दिले आहेत. तर आता पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा बँक यात देखील सत्ता देखील आमचीच असणार आहेत आणि विरोधक हद्दपार होणार आहेत ही काळ्यादगडावरची रेघ आहे. असे व्यक्तव्य करत नितेश राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहेत. तर राणेंना धक्का देणारा अजुन जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार अस म्हणत नितेश राणेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीचा डंका
- युपीत लव्ह जिहादचा तमाशा : नसिरुद्दीन शाह
- कोरोना महामारीमुळे मी पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही; फारुख अब्दुल्लांची व्यथा
- नाथाभाऊंनी भाजपला जागा दाखवली, मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला पुरता धुव्वा !
- नेपोटिजम आणि बॉलिवूड माफियांपेक्षाही याची जास्त भीती वाटते : कंगना रानौत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
